बुलढाणा : भाजपाच्या एका महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याची घटना ताजी असतानाच बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना थेट पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या निवासस्थानी हे धमकीचे पत्र पाठवण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार […]
टॅग: Maharashtra news
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकषांमध्ये कोणताही बदल नाही, मंत्री अदिती तटकरे यांनी केले स्पष्ट
पुणे : महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विरोधकांचे दावे फेटाळून लावत, त्यांनी सांगितले की छाननी प्रक्रिया अनेक महिन्यांपासून सुरू असून ती निवडणुकीनंतर सुरू करण्यात आली नव्हती. तटकरे यांनी खुलासा केला की पडताळणी दरम्यान, ऑगस्टमध्ये ७५,००० आणि सप्टेंबरमध्ये […]
मुंबई-गोवा महामार्गावर मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ आज सकाळी मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. काल बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बावनदी स्टॉपजवळ आज (21 फेब्रुवारी 2025) सकाळी मुंबईच्या […]
संजय राऊतांचा एकनाथ शिंदे आणि शरद पवारांवर तिव्र हल्ला; पैशांच्या जोरावर उभे केलेले बालेकिल्ले आणि अमित शाहांच्या मदतीने पक्ष फोडले असा गंभीर आरोप!
मुंबई: एकनाथ शिंदे यांचा कोणताही बालेकिल्ला नाही, त्यांनी पैशांच्या जोरावर काही बालेकिल्ले उभे केले आहेत. शिंदे यांनी ५० वर्षांत कोणतं महान कार्य केले आहे की बालेकिल्ले उभारले? ते काय लोकमान्य टिळक आहेत? त्यांची विचारधारा काय आहे? ते काय वल्लभभाई पटेल आहेत? दीनदयाळ उपाध्याय आहेत? अटलबिहारी वाजपेयी आहेत? ज्या दिवशी अमित शाह राहणार नाहीत, त्यादिवशी यांची […]
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना ई-मेल, यंत्रणा अलर्ट मोडवर
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल पोलिसांना आला असून, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून अशा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिस या अज्ञात व्यक्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरेगाव पोलीस स्टेशन, जेजे मार्ग […]
तुम्ही कितीही तारीफ करा… तो माणूस फक्त वेळेची वाट पाहातोय, आणखी एक नेता शिंदेंकडे येणार का? शिरसाटांचा दावा काय?
ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतर काही नेते उपस्थित होते. मात्र, भास्कर जाधव या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. “भास्कर जाधव हे जेष्ठ नेते आहेत. उगाच तुम्ही इथे […]
राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत, काहीही बरळतात; भाजपच्या बड्या मंत्र्याची जिव्हारी लागणारी टीका
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करतांना म्हटलं, “फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाहसुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील.” ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, ज्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. यावर संजय […]
पंकजा मुंडेंचे सरकारला साकडं, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी, मायबाप सरकारने प्रा. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनांकडे गांभीर्याने पहावे…
मुंबई : मराठा सामाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी एकीकडं आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर त्यांच्या या मागणी विरोधात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषण करत आहेत. हाके यांनी अन्न-पाणी सोडल्यानं तसेच उपचारांना नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक […]
सरकार-बिरकारच्या भरंवशावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला!
नागपूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन गडकरींचं भाषण म्हणजे […]
मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!
मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज […]









