मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करुन घेतलं आहे. ११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आज गुरुवारी त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं मुख्यमंत्र्यांचा लशीचा डोस घेतानाचा फोटो ट्वीट करत ही माहिती दिली आहे. […]
टॅग: CM Uddhav Thackeray
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता..
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते. कडक निर्बंध की लॅाकडाऊन? हा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच म्हटलं होतं की राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे […]
MPSC ची परीक्षा येत्या आठवड्याभरातच घेतली जाणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : MPSC ची 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यानंतर आता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं सांगितलं. काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव […]
संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पोहोचलाच नाही
मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कायदेशीरपणे संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत. दरम्यान, संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे […]
मुख्यमंत्री साहेब, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल
नाशिक : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात 21 दिवस झाले तरी अद्याप एफआयआर दाखल झाली नाही. सरकार, पोलिस प्रशासन बलात्काऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कशाची वाट पाहत आहे. मला विश्वास आहे की, आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं. मुख्यमंत्री साहेब, खरंच खुर्ची […]
संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल, मंत्रिपद धोक्यात?
मुंबई : वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक पार पडली, त्यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांसह वनमंत्री संजय राठोडही उपस्थित होते. कॅबिनेट बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. वर्षा बंगल्यावर सर्व शिवसेना नेत्यांची बैठक सुरु असल्यामुळे संजय राठोड यांच्याबद्दल काय निर्णय घेतला […]
मोठी बातमी : १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु
मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व नियोजन करून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात येणार आहेत, याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
‘सिरम’मधील आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबवा – मुख्यमंत्री
मुंबई : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश दिले. […]
नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले निर्देश
मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे […]
मनात शंका असेल तर.. कांजूर कारशेडबाबतच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी कांजूर कारशेडबाबतच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. याला ट्विटच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं कि, मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा […]









