मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्र, लेआऊट प्लॅन/मोजणी नकाशा, बिल्डींग प्लॅन आणि हे सर्व प्लॅन युनिफाईड डीसीआरनुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीस […]
टॅग: राज्य सरकार
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आणखी किती वर्षे टोल वसुल करणार? हायकोर्टाने केला सवाल
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर होत असलेल्या टोलवसुलीवर मुंबई उच्च न्यायालयाने आज प्रश्न उपस्थित केला. आणखी किती वर्षे टोल वसुल करणार आहात?, असा सवाल मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं आज (१७ फेब्रुवारी) उपस्थित केला. या एक्सप्रेसवेसाठी झालेला खर्च अजून वसूल झाला नाही का?, जमा होणार्या टोलचा महसुल सरकारी तिजोरीत जमा […]
मुंबई व उपनगरातील महाविद्यालयं सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही
मुंबई : राज्यातील महाविद्यालये उद्या (15 फेब्रुवारी) सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिली आहे. स्थानिक प्रशासन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय देईल, असं शासन निर्णयात सांगितलं आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा […]
येथे अहंकाराचा प्रश्न कुठे येतो, संजय राऊत यांनी दिलं देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर
राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास नाकारल्याने त्यांना खासगी विमानाने प्रवास करावा लागला. जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या सर्व आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आतापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार असल्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना […]
पद्म पुरस्कारांवरून राज्य सरकारने व्यक्त केली नाराजी, शिफारशी डावलल्याचा आरोप
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण पद्म पुरस्काराविषयीच्या राज्य सरकारच्या शिफारशी केंद्राने डावलल्याचा आरोप आता महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. त्यात उद्योगपती मुकेश अंबानी […]
सरकारी धानखरेदी केंद्रे राज्यातील शेतकऱ्यांसाठी, परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अजित पवार
मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रांवर परराज्यातले धान विक्रीसाठी येऊ नये, त्यातून राज्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणासारख्या परराज्यांच्या सीमांवरील नाक्यांवर कडक तपासणी मोहीम राबवावी. परराज्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून राज्यातील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित […]
मोठी बातमी : कांजूर मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवा, उच्च न्यायालायाचा राज्य सरकारला दणका
कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने दिले आहेत. हा राज्य सरकारसाठी मोठा दणका आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. फेब्रुवारीत […]
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं, ‘या’ मुद्द्यांवर घेतली आक्रमक भूमिका
मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. ठाकरे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलं नाही. पूरग्रस्तांना फक्त तीन हजार रुपयांचा धनादेश देणाऱ्या या सरकारची अवस्था राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, अशी झाली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक […]
ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर… देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला इशारा
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही. पण, ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा देतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही […]
ब्रेकिंग : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तूर्तास नकार
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवण्यास तूर्तास नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवल्याने आता पुढील सुनावणी होईपर्यंत नोकरभरती, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत आरक्षण लागू करता येणार नाहीये. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने लावलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू […]










