रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला आहे. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाहीतर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांत अक्षरशः प्राण ओतला. […]
टॅग: उद्धव ठाकरे
ज्येष्ठ नेता काही सांगत असेल तर अहंकार विसरून स्वीकारायला हवं, काँग्रेसच्या इशाऱ्यावर राऊत यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानानं महाराष्ट्र काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. “हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं,” असा इशाराच महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. “राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, पण […]
महाविकास आघाडी सरकारचा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय; सर्व स्तरातून कौतुक..
मुंबई : राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रात आता वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करण्यात आली आहे. वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे द्यावीत असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे […]
उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन, शिवसेनेत जाहीर प्रवेश
वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या व त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेस सोडणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. काही दिवसांपासून उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. संजय राऊत यांनी […]
मुख्यमंत्र्यांची भाषा नाक्यावर होणाऱ्या भांडणांसारखी, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र […]
शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत शिवसेनेवर बोचरी टीका..
मुंबई : बिहार निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेने लढविलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेला ‘शवसेना’ म्हटले आहे. तसंच शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारल्याचा टोला हाणला आहे. महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असेल […]
तुम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे, इतके ध्यानात राहू द्या, शिवसेना नेत्याचा अर्णब गोस्वामी यांना इशारा
मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी गोस्वामी यांची जामिनावर सुटका झाली. याप्रकरणी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकप्रकारे अर्णब यांना इशारा दिला आहे. अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सु्प्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर अर्णब यांनी तळोजा कारागृहाबाहेर जमलेल्या गर्दीपुढे वंदे मातरम, […]
ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा, आक्षेप घेतल्यानंतर प्रस्ताव स्थगित – किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी […]
मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण हे अभ्यासशून्य व सूड भावनेने प्रेरित, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात विरोधकांवर प्रचंड टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सविस्तर उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी थेट सवालही विचारला आहे की, ‘बाळासाहेबांच्या नावाने आपण अजून किती दिवस पोळ्या भाजणार आहात?’ चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य […]
सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही – रामदास आठवले
मुंबई : सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. आठवले म्हटले कि, सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, हे सरकार स्वतः पडणार, सरकार खुद गीर जायेगे, महाविकास आघाडी हार जायेगी अशा […]










