Team India will not lose this year
क्रीडा देश

टीम इंडिया यंदा हरणार नाही! बुमराह-रोहितचा फॉर्म खतरनाक – इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने अत्यंत उत्तम खेळाचं प्रदर्शन करत आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडने गेल्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. पण, यावेळी भारतीय संघ ही हरणार नाही, इंग्लंडला जिंकायचे असेल तर त्यांना काहीतरी विलक्षण कामगिरी करावी लागेल, असे माजी इंग्लंड क्रिकेटर पॉल कॉलिंगवूडने म्हटलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पॉल कॉलिंगवूड म्हणाले कि, यावेळी भारतीय संघात उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. विशेषत: जसप्रीत बुमराह, सध्या तो ज्या फॉर्ममध्ये आहे तो खतरनाक आहे. तो फिट आहे आणि त्याच्या पूर्ण क्षमतेने वेगवान गोलंदाजी करत आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाचीचं कोणत्याही संघाकडे उत्तर नाही. १२० चेंडूंच्या सामन्यात, जर तुमच्याकडे बुमराहसारखा गोलंदाज असेल जो २४ चेंडू टाकतो, त्याने सामन्यात खूप फरक पडतो असं कॉलिंगवूड म्हणाला.

भारतीय संघ अमेरिकेच्या कठीण खेळपट्टीवरही मोठ्या आत्मविश्वासाने खेळताना दिसला त्यांच्याकडे रोहित शर्मासारखा फलंदाज आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली. त्यावरुन दिसून आले की तो आता फॉर्ममध्ये परतला आहे. खरं सांगायचं तर मला वाटत नाही की यावेळी भारतीय संघ हरेल. भारताला हरवण्यासाठी इंग्लंडला असाधारण खेळ दाखवावा लागेल अंसही तो म्हणाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत