चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि ख्रिस गेलच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर १७.४ षटकातच ९ विकेट राखुन शानदार विजय मिळवला. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले आणि या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्याआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर १३१ धावा केल्या होत्या.
पंजाबच्या डावाची सुरूवात राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावा केल्या. मयांक २५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल आणि राहुलने विजयाचे लक्ष्य सहजपणे पार केले. राहुलने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६० धावा केल्या. तर गेलने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले. पंजाबने या विजयामूळे सातव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सच्या गुणतक्यातील स्थानावर कोणताही फरक पडलेला नसून ते चौथ्या स्थानावर कायम आहे.
And that’s that from Chennai.
(60*) from @klrahul11 and 43* from Chris Gayle as #PBKS win by 9 wickets against #MI.
Scorecard – https://t.co/KCBEyHFVDN #VIVOIPL pic.twitter.com/oWfcCxhOmX
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक हुड्डाने दुसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला ३ धावांवर माघारी पाठवले आणि मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशान किशन ६ धावांवर बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. पहिल्या १० षटकात मुंबईला फक्त ४८ धावा करता आल्या.
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. या जोडीने संघाला १०० च्या पुढे नेले. ही जोडी पुन्हा एकदा रवी बिश्नोईने फोडली. त्याने सूर्यकुमारला ३३ धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक करणारा रोहित शर्मा ६३ धावांवर माघारी परतला. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. मधळ्या फळीतील हार्दिक पंड्या पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला आणि ४ चेंडूत एक धाव करून बाद झाला. अखेरच्या चार षटकात मुंबईला फक्त २६ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर केवळ १३१ धावा करता आल्या.




