मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून आज मुंबईसह एकूण नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
आज मुंबईसह, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, पुढील तीन तासांत मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांच्या गडगडाटासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास टाळण्याचा आणि मोठ्या झाडाखाली उभे न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यात रेड व ओरेजं इशारे
Severe weather warnings by IMD today for Maharashtra for 19-23 Jul.
Entire Konkan & parts of madhya Mah r on Red Alert today. D2,3 Orange alert issued
Parts of marathwada,Vidarbha r likely to covered with Yellow alert during period.
Watch IMD updates pl. pic.twitter.com/DaYND84h2w— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 19, 2021




