The body of a person

अन् क्षणात होत्याच नव्हतं! तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू, पाच दिवसांवर आलं होतं लग्न…

जळगाव महाराष्ट्र

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अतिशय दुःखद घटना घडली आहे. अवघ्या पाच दिवसांनी ज्याचे लग्न होणार होते, त्या तरुणाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला आणि घरातील आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलून गेले. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एरंडोल येथे घडली. भावेश संजय महाजन (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरातील रहिवासी संजय विठ्ठल महाजन यांचा मोठा मुलगा भावेश याचा २५ एप्रिल रोजी विवाह होणार होता. बुधवारी सकाळी भावेश गावात राहणारे त्याचे काका ज्ञानेश्वर महाजन यांच्याकडे गेला. नाश्ता करायला जात असल्याचे सांगत भावेश काकांची दुचाकी घेवून गेला. बराच वेळ उलटूनही भावेश परत न आल्याने ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी जाऊन चौकशी केली. तेव्हा तो अद्याप घरी आला नसल्याचे भावेशच्या आई वडिलांनी सांगितले.

त्यानंतर सर्वांनी भावेशचा शोध सुरु केला. शोध घेत असताना भावेश धरणगाव रस्त्यावरील सुनील पाटील यांच्या विहिरीत पडल्याचे समजले. त्यानंतर भावेशच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. भावेशला विहिरीतून बाहेर काढून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत