Rajesh Tope announces Mission Kavach Kundal

राज्य होणार कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त, राजेश टोपे यांनी दिली माहिती

महाराष्ट्र

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आता १ एप्रिलपासून कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

१ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई होईल अशीही माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. दरम्यान, राजेश टोपे यांनी यावेळी काही सूचना देताना म्हटले की लसीकरणाच्या बाबतीत चालढकल नको. तसेच मास्कसक्ती कायम आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत