पुणे : आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, काचेच्या खिडक्या व फर्निचरचे तोडफोड करून मोठे नुकसान केले. ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
कचरा प्रकल्प असल्याने काही क्षणात आगीचे आणि धुराचे लोळ आकाशात पसरले. त्यामुळे परिसरात धुर खूप दूर पर्यंत पसरला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझविण्यास सुरवात झाली. परंतु कचरा, प्लॅस्टिकमुळे आग वाढत होती. त्यावर अग्निशामक दलाच्या तीन बंबानी पाण्याचा मारा केला. त्यानंतर एक ते दोन तासांनी आगीवर नियंत्रण आले.