मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 3-4 तासांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत आयसोल ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. बाहेर पडताना खबरदारी घ्यावी असा इशारा देखील देण्यात आला आहे.
हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30-40 किमी प्रतितास इतक्या तीव्रतेने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
Nowcast warning at 1500hrs,11 Oct: Thunderstorm with lightning & mod to intense spells of rain,gusty winds 30 to 40 kmph vry likely to occur at isol places in districts of Thane,Raigad, Ratnagiri,Sindhudurg,Satara during next 3-4hrs.Take precautions while moving out.
-IMD MUMBAI pic.twitter.com/M7rOsUNMIl— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2021




