बेंगळुरू : ज्येष्ठ कन्नड अभिनेते ‘कलातपस्वी’ राजेश यांचे आज बेंगळुरू येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 9 फेब्रुवारीला श्वसनाचा त्रास आणि वयोमानाशी संबंधित आजारांमुळे बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या राजेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज (19 फेब्रुवारी) सकाळी त्यांची प्रकृती खालावली. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने त्यांचे चाहते हळहळले.
15 एप्रिल 1932 रोजी बेंगळुरू येथे मुनी चौडप्पा म्हणून जन्मलेल्या राजेश यांनी शालेय आणि महाविद्यालयीन दिवसांपासून नाटकांमध्ये काम केले आहे. नंतर त्यांची ओळख विद्यासागर अशी झाली. चित्रपटसृष्टीत ते ‘कलातपस्वी’ राजेश म्हणून लोकप्रिय झाले. 60 च्या दशकात त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी शेकडो चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत.
राजेश यांची मुलगी आशा राणी देखील एक फिल्ममेकर आहे. अभिनेता अर्जुन सरजाने 1988 मध्ये आशा राणीसोबत लग्न केले होते.




