sushant singh rajput
मनोरंजन

सुशांतच्या खात्यातून ५३ कोटी काढले गेले, यावर मुंबई पोलिसांचं मौन- बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करत नसल्याचा आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर पैसे उकळल्याचाही आरोप केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यात ५५ कोटी रुपये जमा केले गेले आणि आश्चर्यकारकरित्या ५३ कोटी खात्यातून काढले गेले. एका वर्षात १७ कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा केले गेले. त्यापैकी १५ कोटी रुपये काढले गेले. विशेष म्हणजे त्याने घर घेतलं नाही, गुंतवणूक केली नाही, मग इतके पैसे कुठे गेले, हा तपासासाठी महत्त्वपूर्ण विषय नाही का? आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मुंबई पोलिसांना याबद्दल प्रश्न विचारणार”, असं बिहारचे पोलीस महासंचालक म्हणाले.पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तपासासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सक्तीने क्वारंटाइन करण्यात आलं. याविषयी ते म्हणाले, “सुशांत प्रकरणात मिळवलेले पुरावे आणि शवविच्छेदन अहवाल विनय तिवारी यांच्याकडे सोपवण्याऐवजी त्यांनी अधिकाऱ्याला क्वारंटाइन केलंय. मी कोणत्याही राज्याच्या पोलिसांकडून अशाप्रकारची वागणूक पाहिली नाही. जर मुंबई पोलिसांचा प्रामाणिक दृष्टीकोन असेल तर त्यांनी आम्हाला तपासाची परवानगी द्यायला हवी आणि सहकार्य करायला हवं,” असंही बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत