अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतचा चुलत भाऊ नीरज सिंह बबलू यांनी ट्विट करत म्हटले की, “आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की, मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारची गडबड करु नये, साक्षीदार अडचणीत येऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत साक्षीदारांच्या सुरक्षेबाबत आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांबाबत बोलू.”
साक्षीदारांसोबत कोणत्याही अनुचित घटनेची भीती व्यक्त करीत भाजपचे आमदार म्हणाले की, या केसमधले पुरावे नष्ट करण्यात येत आहेत,अशी आम्हाला शंका आहे. ही भीती माध्यमांकडूनही व्यक्त केली जात आहे. साक्षीदारांना धमकावले जात आहे. मुंबई पोलिस त्यांना संरक्षणही देत नाहीत. ज्या प्रकारे गोष्टी उलगडत आहेत, त्या पाहता साक्षीदारांना जीवे मारले जाण्याचीही भीती आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याची दखल घ्यावी. साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असे नीरज सिंह बबलू म्हणाले.




