मनोरंजन

सुशांतच्या मृत्यूप्रकरणात साक्षीदारांच्या जीवाला धोका, सुशांतच्या भावाने व्यक्त केली भीती

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतचा चुलत भाऊ नीरज सिंह बबलू यांनी ट्विट करत म्हटले की, “आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की, मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारची गडबड करु नये, साक्षीदार अडचणीत येऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत साक्षीदारांच्या सुरक्षेबाबत आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांबाबत बोलू.”

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

साक्षीदारांसोबत कोणत्याही अनुचित घटनेची भीती व्यक्त करीत भाजपचे आमदार म्हणाले की, या केसमधले पुरावे नष्ट करण्यात येत आहेत,अशी आम्हाला शंका आहे. ही भीती माध्यमांकडूनही व्यक्त केली जात आहे. साक्षीदारांना धमकावले जात आहे. मुंबई पोलिस त्यांना संरक्षणही देत नाहीत. ज्या प्रकारे गोष्टी उलगडत आहेत, त्या पाहता साक्षीदारांना जीवे मारले जाण्याचीही भीती आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याची दखल घ्यावी. साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असे नीरज सिंह बबलू म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत