आयपीएलचे सामने भारतातच घेण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका

क्रीडा

आयपीएलचे सामने मार्चमध्ये होणार होते. मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाहीत. तेव्हा भारत सरकारच्या परवानगीनं आता १९ सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दुबई, शारजाह, आणि अबूधाबी इथं हे सामने घेण्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मात्र आयपीएलचे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. आयपीएलचे सामने भारतातच घेण्याची मागणी या याचिकेतून केली गेली आहे. पुण्यातील वकील अभिषेक लागू यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

आयपीएल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर नावजलेली एक मोठी स्पर्धा असल्यानं हे देशासाठी उत्पन्न मिळण्याचे महत्वपूर्ण साधन आहे. या दरम्यान देशातील अनेक उद्योगांना चालना मिळत असते. मागील वर्षी आयपीएलचं ब्रॅण्ड मूल्य हे 475 अब्ज कोटी इतकं होतं. आयपीएल हे बीसीसीआयच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे, त्यामुळे हे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेऊ नयेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत