नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल (१८ मे) कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणच्या ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकून ‘पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवा’ असं म्हटलं होतं. त्यांचा हा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगानं […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चेला उधाण, ‘त्या’ मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले…
मुंबई : जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्गारही त्यांनी काढले. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, आज याबाबत शिवेसना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते […]
लस, ऑक्सिजन आणि औषधांसह पंतप्रधान देखील गायब, शिल्लक आहेत फक्त…
भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर्षी कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोना परिस्थितीशी लढण्यासाठी योग्य धोरण न बनविल्याबद्दल आणि मोदी सरकारवर टीका होत आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे आणि देशातील ऑक्सिजन, लस तसेच औषधाच्या […]
लसीचे निर्यात धोरण आणि लसीचा तुटवडा, विरोधकांच्या आरोपांवर भाजपचं स्पष्टीकरण, निर्यातीसंदर्भात दिली माहिती
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सध्या देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु आता ऑक्सिजनसोबतच लसीचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून भाजपशासित नसणारी राज्य सरकारं आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी आज (१२ मे) कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले. त्याचबरोबर केंद्र सरकारमुळेच ‘भारत बायोटेक’ने […]
शिवसेनेने लढवय्या नेत्या गमावल्या; नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन
नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]
धक्कादायक : केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच, शेअर केला व्हिडीओ
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेला राजकीय हिंसाचार थांबत नाहीये. गुरुवारी केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांच्या गाडीवर स्थानिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या ताफ्यावर दगड व काठीने हल्ला करण्यात आला. ही घटना पश्चिम मिदनापुरच्या पंचखुडीची आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी स्वत: सोशल मीडियावर हल्ल्याची माहिती दिली. व्हिडिओ प्रसिद्ध करताना ते म्हणाले कि, “तृणमूलच्या गुंडांनी माझ्या […]
राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन
मुजफ्फरनगर : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. कोरोना झाल्यानंतर गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २0 एप्रिल रोजी अजित सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना […]
‘त्या’ विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर […]
रेमडेसिवीर: विखे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज, व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा करायला नको होता, हायकोर्टाने सुनावले
औरंगाबाद: एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर ताशेरे ओढले. डॉ. सुजय विखे यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी […]
गड आला पण.. ममता बॅनर्जींचा पराभव, जनतेचा कौल मान्य पण कोर्टात जाणार : ममता बॅनर्जी
कोलकाता : पश्चिम बंगालमधून भाजपचा मोठा पराभव झाला असला तरी ममता बॅनर्जी यांचा प्रभाव झाला आहे नंदीग्राम मधून भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाला आहे. ममता बॅनर्जी यांचा भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केल्याचं समजत आहे. पराभव झाल्याचं ममतांनी जवळजवळ मान्य केलं आहे. पण आपण कोर्टात जाणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत. ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वातील तृणमूल […]










