स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी व प्रतिलिटर अनुदान देण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूधपावडर आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या आंदोलनाला प्रतिसाद देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. सर्वजण मिळून काम करत आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. सुशांत सिंह राजपूत […]
सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्रीच- अशोक चव्हाण
सध्या राज्यात तीन पक्षांच सरकार असलं तरी राज्य सरकारचं स्टेअरिंग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचं सार्वजनिक बांधाकम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास सरकार पुढील पाच वर्षे टिकेल असा विश्वास देखील चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केला. अशोक चव्हाण म्हणाले, सरकार […]
आरे संदर्भातील प्रश्न महाराष्ट्र सरकारचा- प्रकाश जावडेकर
आरे संदर्भातील प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे. आरे संदर्भातील विषय केंद्राकडे आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकाश जावडेकर म्हणाले, सर्व शहरात इलेक्ट्रीक बस आणणे आणि शहरातील हवा शुद्ध ठेवणे हा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणाचा समतोल आणि विकास हे आमचे […]
आपलं राज्य सर्व गोष्टींनी सुसज्ज असायला हवं- छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा अर्थ आहे. या राज्याला खरोखरच शौर्य, क्रिडा, कला सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. परंतु, आपण जर परदेशात गेलो तर तिथल्या गोष्टी पाहून असं वाटतं की, आपण किती मागे आहोत. इतिहासाबाबत सर्वांना प्रेम पाहिजे, त्यासंदर्भात सगळी माहिती पाहिजे, इतिहास […]
तुकाराम मुंढेंनी धडक कारवाई करत नियम मोडणारांवर केली दंडात्मक कारवाई
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून धडक कारवाई केली. सेंट्रल एव्हेन्यू, मस्कासाथ, इतवारी, चितार ओळ या भागाचा आकस्मिक दौरा केला. आयुक्तांच्या निर्देशावरून अनेक ठिकाणी दुकानाचे फुटपाथवर ठेवलेले सामान अतिक्रमणविरोधी पथकाने जप्त केले. त्यानंतर काही दुकानात स्वतः शिरून पाहणी केली. पाच पेक्षा अधिक ग्राहक असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. चितार ओळ येथील मूर्तीकारांनीही […]
पुणे महापालिकेला अर्थसहाय्य करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन नाही
गेल्या चार महिन्यांत पुणे महापालिकेने ३०० कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च के ला आहे. आता महापालिकेची आर्थिक मर्यादा पाहता राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेच नव्हे, तर राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर असून महापालिका राज्य सरकारकडे आणि आम्ही केंद्राकडे निधीची मागणी करत आहोत, असे सांगत कोणतेही ठोस […]
पुण्यातील परिस्थिती तीन आठवड्यात बदलण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुण्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. पुण्यातील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील करोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनास तीन आठवड्याचा वेळ दिला आहे. विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांना पुण्यातील […]
पुढील २-३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
पावसाला आवश्यक कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्यांची चक्रीय स्थिती सध्या कमकुवत आहे. मात्र, अरबी समुद्रात अनुकूल स्थिती निर्माण होणार असल्याने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१ जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या तीन दिवसांमध्येही कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार […]
मुंबईत उद्यापासून २०% पाणीकपात
मुंबईत शनिवारपासून (१ ऑगस्ट) २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई पालिका आयुक्तांनी घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आज चार लाख ९९ हजार १९९ दशलक्ष लिटर पाणी आहे. हे जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या ३४% इतके आहे. गेल्या वर्षी याच वेळी तलावात १२ लाख […]









