नांदेड : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात आयोजित रोजगार मेळाव्यात तब्बल २ हजार मुलींची टाटा सारख्या नामांकित कंपनीत निवड झाली. टाटा कंपनीतर्फे निवड झालेल्यांना 16 हजार रुपयाचे विद्यावेतन, 3 लाख रुपयांचा विमा, जेवण व राहण्याची सुविधा देण्यासह 24 तास वैद्यकीय सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. नुकतीच […]
नांदेड
ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे – विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी
नांदेड : कोरोनाच्या कालावधीत हिरमुसलेले विद्यार्थी आता नियमित शाळा सुरू झाल्याने विविध उपक्रमाप्रतीही तेवढेच उत्सूक आहेत. शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यांएवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक संपत्ती आहे. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचेही योगदान तेवढेच मोलाचे आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे. […]
…अन्यथा ती दोन गावे वाहून गेली असती
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सिमेवर असलेले शेवटचे गाव अप्पारावपेठ. गत तीन दिवसाच्या सलग पावसाने किनवट तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगेसह सर्वच लहान-मोठ्या नदी, नाल्याचे पाणी धोक्याच्या पातळीवर आलेले. विशेष म्हणजे माहूरच्या डोंगररांगा या संपूर्ण किनवट तालुक्यासह आदिलाबाद पर्यंत पोहचलेल्या आहेत. याच डोंगररांगावर किनवट तालुक्यातील सिमेवरचे गाव म्हणून अप्पारावपेठ ओळखले जाते. या गावाची दुसरी ओळख म्हणजे या […]
श्रीक्षेत्र माहूरगड विकासाला सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून चालना देऊ – अशोक चव्हाण
नांदेड : श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन 2010 मध्ये 79 कोटी रुपयाच्या मूळ आराखड्यास मान्यता दिलेली आहे. यात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वाहतूक पायाभूत सुविधा, इतर आधारभूत पायाभूत सुविधा विकसीत करण्याचा अंतर्भाव केलेला आहे. याचबरोबर पुरातत्व, जलसंधारण, पाणी पुरवठा, वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून माहूरगड विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून […]
ठिबकसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, यातून कमी पाण्यात अधिकची प्रगती साध्य
नांदेड : उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर होण्याच्या दृष्टीकोनातून ठिबक सारखे तंत्रज्ञान मोलाचे आहे. संपूर्ण जगाने हे तंत्रज्ञान स्वीकारुन कमी पाण्यात अधिकची प्रगती यातून साध्य करुन दाखवली आहे. राज्यातही ठिबकबाबत शेतकऱ्यांच्या मनात चांगली जागृती झाली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी अधिक पाणी न वापरता ठिबकद्वारे हे पाणी वापरल्यास कमी पाण्यात दर्जेदार कृषी उत्पादन घेता येईल. विशेषत: ऊस […]
नांदेडमध्ये खळबळ! २४ तासात दोन तरुणांची निर्घृण हत्या
नांदेड, 01 मे : नांदेड शहरात गेल्या दोन दिवसात दोन जणांचा खून झाला आहे. दोन दिवसात झालेल्या दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पहिला खून जुन्या नांदेड शहरात झाला आहे. एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आला आहे. तर दुसरा खून मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूनं वार करून केला आहे. […]
दुःखद! हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
नांदेड : हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी देखील झाले. या स्फोटात सुनील मारवाड (वय 28) यांचा जागीच मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत गावात ही घटना घडली. कच्ची हळद शिजवताना कूकरमधून पाण्याची गळती होऊ लागली. त्यामुळे नक्की काय झाले हे पाहण्यासाठी सुनील […]
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या, त्यांच्या घरासमोरच केला गोळीबार
नांदेड : नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या दोघांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत होते. पण उपचारादरम्यान बियाणी यांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार कुणी केला याचा पोलीस घटनास्थळी येऊन शोध घेतायत. आज सकाळी ११ वाजेची […]
भयंकर! विजेच्या खांबावर चढून काम करताना वीज प्रवाह सुरू झाला आणि अनर्थ घडला…
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर इथे वीज वितरण कर्मचाऱ्याचा काम करताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करीत असताना वीज प्रवाह सुरू झाल्याने हा अपघात घडला. वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे ज्ञानेश्वर ताटे यांचे या दुर्दैवी घटनेत निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हे काम करण्यासाठी फोन परमिट घेण्यात आले […]
वडिलांनीच आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरीत फेकले, धक्कादायक कारण आले समोर…
नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या एका व्यक्तीने अतिशय भयंकर कृत्य केले आहे. वडिलांनीच आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी समोर आली. याप्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माधव देव्हारे असे आरोपी वडिलांचे नाव असून अभिषेक देव्हारे […]









