अमरावती : हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाद्वारे खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात विम्याचा लाभ दिला जाणार असून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासन भरणार आहे. या योजनेचा विभागातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे […]
अमरावती
अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट तयार करण्याचा निर्णय
मुंबई : राज्यात लिंबुवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी लिंबुवर्गीय फळपिकांसाठी अमरावती जिल्ह्यातील मासोद (ता. चांदूर बाजार) येथे “सिट्रस इस्टेट” तयार करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात संत्रा-मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भात १.३४ लाख हेक्टर इतके आहे. संत्र्याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहता अधिकाधिक उत्पादने घेणे व त्यावर प्रक्रीया करणे […]
आपत्ती व्यवस्थापन व शोध बचाव पथकाचे विभागीय आयुक्तांकडून कौतुक
अमरावती : पूर प्रसंग, आगीची घटना व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जीवितहानी न होता, काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच महापालिका अग्निशमन दलाने प्रात्यक्षिके सादर करुन त्यासंबधी माहिती दिली. आगीच्या दुर्घटनांमध्ये बहुसंख्य वेळेस मानवाचा निष्काळजीपणा हे कारण दिसून आले आहे. गॅस […]
अमरावती येथे कौटुंबिक न्यायालयासह पदांना मान्यता
मुंबई : अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक ती पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कौटुंबिक न्यायालयासाठी नऊ नियमित पदे व ३ पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेकडून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
भरडधान्यांचे महत्त्व आणि कृषी महोत्सव
खाद्यसंस्कृती ही प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात आणि भाकरी किंवा पोळी खाल्ली जाते. त्यातही पूर्वी ज्वारीच्या भाकरी हा आपल्या आहाराचा प्रमुख घटक होता. नंतर त्याची जागा गव्हाच्या पोळीने घेतली. पूर्वी प्रदेशाच्या भौगोलिक […]
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात NIA कडून मोठा खुलासा, मारेकरी तबलिगी जमातशी संबंधित
अमरावती : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. NIA ने खुलासा केला आहे की, ‘उमेश कोल्हे यांची हत्या करणारा व्यक्ती तबलीगी जमातीचा होता’. सामाजिक कार्यकर्ते इरफान खान आणि मौलवी मुशफिक अहमद त्याला भडकावायचे. एनआयएने असेही सांगितले की, ‘कोल्हे अमरावतीमध्ये त्यांचे मेडिकल स्टोअर चालवत होते. 21 जूनच्या संध्याकाळी तिघांनी मिळून […]
पावसावर अवलंबित कृषी प्रणालीत बदलासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे
अमरावती : पावसावर अवलंबून असलेल्या कृषी प्रणालीत विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची सांगड घालून सर्व विभागांनी संघटीत व सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दिले. विभागीय आयुक्तालयात पश्चिम विदर्भात पावसावर अवलंबून असलेल्या शेती प्रणालीबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. महाराष्ट्र आरआरए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी तसेच विभागातील पाचही […]
जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेबाबत चोवीस तासांत अहवाल सादर करा, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रातील आगीच्या घटनेबाबत २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयातील शिशु दक्षता केंद्रात व्हेंटिलेटर मशिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. केंद्रातील १२ […]
नागपूरच्या वैद्यकीय टीमची मदत न घेता अमरावतीच्या रुग्णालयात तज्ज्ञांकडून किडनी प्रत्यारोपण यशस्वी
अमरावती : अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात नागपूर येथील वैद्यकीय चमूची मदत न घेता स्थानिक तज्ज्ञांनी किडनी प्रत्यारोपण यशस्वी केले. या रुग्णालयाचे हे पंधरावे प्रत्यारोपण होते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खिरसाना येथील श्रीमती किरण अशोक नंदागवळी या मातेने आपल्या मुलाला किडनी दान करून जीवनदान दिले. अत्यंत गरीब कुटुंबातील, वडिलांचे छत्र नसलेला सोमेश्वर अशोक नंदागवळी हा 24 […]
आदिवासींच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत
मुंबई : आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना कालबद्ध पद्धतीने प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याबाबत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा. सावंत बोलत होते. यावेळी या चर्चेत सदस्य यशोमती ठाकूर, देवराव होळी, सुलभा खोडके, आशिष जयस्वाल, राजेंद्र शिंगणे यांनी भाग घेतला. आरोग्यमंत्री […]










