नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ई-केवायसी प्रक्रिया करू शकता. १५ डिसेंबरपर्यंत पीएम […]
टॅग: केंद्र सरकार
मोठी बातमी! केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशवासीयांना दिवाळीनिमित्त मोठी भेट दिली आहे. दिवाळीची भेट म्हणून सरकारने आजपासून (४ नोव्हेंबर) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. ✅ Prices of Petrol and Diesel will come down accordingly […]
पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या…
पुणे : केंद्र सरकारने अंथरुणाला खिळलेल्या आणि विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाल्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुंबईत अशाप्रकारे घरोघरी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 9 ऑगस्टपासून पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर येऊ न शकणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन महापालिकेतर्फे कोरोनाची लस दिली […]
ब्रेकिंग! पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलले
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. देशाचा गौरव वाढवणाऱ्या अनेक क्षणांचा अनुभव घेत असताना लोकांनी केलेल्या आग्रहानुसार खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले […]
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा, केंद्राकडे मागणी
मुंबई : एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी, असे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना ते […]
दररोज फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करून मिळवा ३६ हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या…
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अनेक पेन्शन योजना वृद्धापकाळात दर महिन्याला एक निश्चित पेन्शनची हमी देतात. तुम्ही दररोज फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करून 3000 रुपये मासिक पेन्शन मिळवू शकता. म्हणजेच वर्षाला तुम्हाला ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल. या योजनेचे नाव आहे ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’. सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. तुमचे […]
केंद्र सरकारने महाराष्ट्राला महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, कारण…
मुंबई : केंद्र सरकारने राज्याला दर महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणारा ठराव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत मांडला. त्याची कारणे देखील त्यांनी सांगितली. यावेळी कोरोना परिस्थितीची माहिती देतानाच उपनगरीय लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं तर लोकल सुरू […]
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांना द्यावी नुकसान भरपाई
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय देत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही भरपाई किती असावी याचा निर्णय सरकारलाच घ्यायचा आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोविडशी संबंधित मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच जी प्रमाणपत्रे यापूर्वी दिली गेली आहेत ती दुरुस्त करण्यास […]
ट्विटरने पुन्हा केली भारताच्या नकाशासोबत छेडछाड
नवी दिल्ली : ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरने यावेळी पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की ट्विटरने आपल्या वेबसाईटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केलेला नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र देश असल्याचं आपल्या वेबसाइटवर दाखवले […]
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ शकत नाही, केंद्र सरकारने केले स्पष्ट
नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे जाब विचारला होता. त्यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन आपले उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की कोरोनामुळे बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देता येणार नाही. प्रत्येक कोरोना संक्रमित रुग्णाच्या मृत्यूची भरपाई देणे, […]










