नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
देशाचा गौरव वाढवणाऱ्या अनेक क्षणांचा अनुभव घेत असताना लोकांनी केलेल्या आग्रहानुसार खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले जाणार आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
देश को गर्वित कर देने वाले पलों के बीच अनेक देशवासियों का ये आग्रह भी सामने आया है कि खेल रत्न पुरस्कार का नाम मेजर ध्यानचंद जी को समर्पित किया जाए। लोगों की भावनाओं को देखते हुए, इसका नाम अब मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार किया जा रहा है।
जय हिंद!
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे कि, “मेजर ध्यानचंद हे भारतातील अग्रगण्य खेळाडूंपैकी होते, ज्यांनी भारताचा सन्मान आणि अभिमान वाढवला. आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्यांच्या नावावरून ओळखला जाईल हे योग्य आहे.”
Major Dhyan Chand was among India’s foremost sportspersons who brought honour and pride for India. It is fitting that our nation’s highest sporting honour will be named after him.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021




