मुंबई : येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर […]
टॅग: varsha-gaikwad
अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन, आजपासून पहिल्या फेरीची सुरूवात
मुंबई : अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार […]
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार…
मुंबई : राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत. शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे […]
राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू होणार, राज्य सरकार करणार 471 शासकीय शाळांचे परिवर्तन
मुंबई : राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक पार पडणार आहे. सध्या आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला […]
बारावीचा निकाल आज दुपारी 4 वाजता होणार जाहीर
आज दुपारी 12 वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आउटही काढता येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला […]
पूरबाधित शाळांतील शिक्षण पूर्ववत करावे – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली. क्षतीग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचे नियोजन करून तेथे लवकरात लवकर शिक्षण सुरु करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीत उपस्थित शालेय शिक्षण अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या नुकसानासंबंधी माहिती दिली. ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तकांचे नुकसान झालेले आहे, त्या ठिकाणी […]
दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कार्यरत असलेल्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्ड या विविध बोर्डांमध्ये एकवाक्यता नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारही या परीक्षांच्या […]
पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास, नववी आणि अकरावीबाबतच्या निर्णय लवकरच – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घोषणा केली. राज्यातील लाखो विद्यार्थी- पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, इयत्ता नववी आणि अकरावीबाबतच्या निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. […]
पाचवी ते आठवीचे वर्ग ‘या’ तारखेपासून होणार सुरु, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागच्यावर्षी राज्यातील शाळा बंद होत्या. आता शाळा सुरु होत आहेत. नववी ते बारावीचे वर्ग अगोदरच सुरु झाले होते. आता सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली कि, येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले […]
या कारणामुळे शाळा बंदच राहू शकतात..
पुणे: राज्य सरकारनं 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरु करण्याची तयारी पुणे महापालिका करत आहे. मात्र शाळा सुरु होण्यापूर्वीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठमधील उर्दू शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. पुणे महापालिकेमधील […]








