कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागच्यावर्षी राज्यातील शाळा बंद होत्या. आता शाळा सुरु होत आहेत. नववी ते बारावीचे वर्ग अगोदरच सुरु झाले होते. आता सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली कि, येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे कि, “मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते”
शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.




