राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव […]
टॅग: varsha-gaikwad
अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. […]
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग
मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, “नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा. […]
महाराष्ट्रात शाळा सुरु करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली आहे. मात्र महाराष्ट्रात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील की नाही, याबाबत चाचपणी करण्यासाठी शिक्षण विभागाने शुक्रवारी […]
शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु – वर्षा गायकवाड
शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यात आणि देशात 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थितीत सुधार होईल आणि जनजीवन सुरळीत होईल आणि शाळाही सुरु होतील अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. […]



