राजस्थान : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, चांद्रयान-३ चंद्रावर उतरले आहे, पण राहुलयान आतापर्यंत ना उतरवले गेले आहे ना प्रक्षेपित झाले आहे. ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. […]
टॅग: Rajnath Singh
सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली माहिती
लडाखमध्ये चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादाच्या विषयावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संसदेत बोलत होते. पँगाँग टीसओ सरोवर भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली. भारत आपली एक इंच जमीनही कोणाला घेऊ देणार नाही, असंदेखील ते यावेळी म्हणाले. भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण […]
पाकिस्तानी मंत्र्याच्या वक्तव्यानंतर काँग्रेस गप्प का? – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारतात झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. आता पाकिस्तानच्या संसदेत त्यांच्या एका मंत्र्यांनं केलेल्या वक्तव्यावरुन आमचा दावा खरा ठरला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्यावेळी काँग्रेसने या हल्ल्याबाबत संशय उपस्थित केला होता आणि पंतप्रधानांवरही काही आरोप केले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपलाच […]
शस्त्र पूजेनंतर संरक्षणमंत्री म्हणाले, भारतीय सैन्य एक इंच जमीनही शत्रूच्या हाती जाऊ देणार नाही
दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्र पूजन केले. रविवारी सकाळी त्यांनी दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकाला श्रद्धांजली वाहिली आणि सैनिकांना संबोधित केले. त्यांच्यासमवेत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील होते. शस्त्र पूजेनंतर संरक्षणमंत्री म्हणाले की यावेळी भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे. शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भारताची इच्छा आहे, […]
राफेल गेम चेंजर आणि मल्टी रोल कॅपॅसिटीसोबत शत्रुला धडा शिकवण्यासाठी सक्षम- राजनाथ सिंह
अंबाला हवाई तळावर पाच राफेल लढावू विमानं भारतीय वायुसेनेत औपचारिकरित्या सामील झाले. यावेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या भाषणात म्हणाले कि, ‘भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम म्हटलंय परंतु, सीमेवर कोणत्याही पद्धतीच्या दु:साहसाचं प्रत्यूत्तर देण्यासाठीही भारत तयार आहे. राफेलचा वायुदलातील सहभाग सीमा सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.’ सीमेवर ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते […]





