मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या. याचा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी बेस्ट व्यतिरिक्त एसटी महामंडळाच्या काही गाड्याही मुंबईत धावत होत्या. पण ही सेवा आजपासून (14 जून) थांबविण्यात आली आहे. मात्र, लोकल अद्याप सुरु झालेली नसल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. परिवहन मंत्री […]
टॅग: mumbai
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी पास लागेल का? जाणून घ्या…
मुंबई : राज्य सरकारने आजपासून नवी नियमावली लागू केली असून राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अनलॉक प्रक्रियेबाबत शासकीय स्तरावर निर्णय घेतला असला तरी स्थानिक प्रशासनाला निर्बंध हटवायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. मात्र एका जिल्ह्यातून […]
NCB ची मोठी कारवाई, सुशांतला ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर हरीश खानला अटक
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान नावाच्या या ड्रग पेडलरला एनसीबीने वांद्रेमधून अटक केली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज […]
मोठी बातमी: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश
मुंबई: राज्यातील व्यापारी समाज लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत असताना ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात […]
मुंबईत उद्यापासून शुक्रवारपर्यंत पाच दिवस पाणीकपात
मुंबई : मुंबईत उद्यापासून (१७ मे) शुक्रवार (२१ मे) पर्यंत सलग पाच दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची तातडीने दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा त्रास सोसावा लागणार आहे. भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. पिसे बंधाऱ्यातून पाणी शुद्धीकरण केंद्रात आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. […]
राज्यात म्युकरमायकोसीस या प्राणघातक आजाराचा फैलाव सुरु, राज्य सरकारने सजग होत घेतला मोठा निर्णय..
मुंबई : राज्यात प्राणघातक म्युकरमायकोसीस आजाराचा फैलाव सुरु झाला आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सजग भूमिका घेतली आहे. ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती […]
मोठी बातमी : टेकऑफ करताच गळाले विमानाचे चाक, धावपट्टीवर ‘फोम’ पसरवून केली आश्चर्यजनक लँडिंग
मुंबई : नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या वैद्यकीय विमानात (एअर ऍम्ब्युलन्स) झालेल्या बिघाडानंतर प्रचंड गोंधळ झाला, पण नंतर हे विमान सुखरुप मुंबईत दाखल झाले आहे. विमानात गडबड झाल्याचे लक्षात येताच ते मुंबईकडे वळविण्यात आले. यासाठी संपूर्ण इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली. क्रॅश लँडिंगची भीती निर्माण झाली होती, पण अखेर या विमानाला सुरक्षितपणे उतरवण्यात यश मिळाले. या विमानात एक […]
पुन्हा अग्रितांडव! ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटला आग; चार रुग्णांचा मृत्यू
ठाणे: राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही. मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मिळालेल्या माहिती नुसार, […]
ब्रेकिंग : अनिल देशमुखांविरुध्द गुन्हा दाखल, १० ठिकाणी सीबीआयची छापेमारी
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयनं चौकशी केली. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या मुंबईत बांद्रा, वरळी तसेच नागपूर अशा १० […]
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या केंद्रावर लस तुटवडा; “VACCINE OUT OF STOCK” चे फलक
मुंबईः मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल येथील लसीचे डोस संपल्याने प्रवेशद्वाराजवळ आज (२० एप्रिल २०२१) लस संपल्याचे फलक झळकले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागलं. तर, काही नागरिकांनी लसीकरणासाठी उन्हात रांगेत उभं असल्याचं चित्र होतं. लसीकरण केंद्राचे प्रमुख राजेश डेरे म्हटले कि, कोविशील्डचे ३५० ते ४०० डोस केंद्रात […]










