जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर (टीओबी) गोळीबार केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी […]
टॅग: Home Minister
वारजे भागात पुन्हा कोयता गँगची दहशत, सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत […]
राज्यपाल, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून 13 वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी […]
सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट
मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहु, असे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्र्यांना यावेळी सांगितले. सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वांसाठी मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस […]
चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. मंत्रालयातील समिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व […]
भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई : विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली. दरम्यान, विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी आज […]
परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
मुंबई : परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं कि, “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस […]
गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये वसुल करण्यास सांगितलं – परमबीर सिंग
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्वाचे मुद्दे : मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी […]
आता सामान्य नागरिकांना येरवडा जेलमध्ये जाता येणार – गृहमंत्री अनिल देशमुख
26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती […]
पोलीस भरती प्रक्रिया सुरु, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
राज्यातील रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. मात्र, आम्ही मराठा नेत्यांशी बोललो आहोत. राज्यात […]