पुणे : रविवारी सकाळी माळशेज घाटाजवळील काळू धबधब्याजवळ दरड कोसळून पुण्यातील २३ वर्षीय हिमालकुमार बिनोदकुमार सिंग (खराडी) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा साथीदार अंशुमन मौर्य (२३) जखमी झाला. दोघेही पुण्यातील ट्रेकिंग गटाचा भाग म्हणून धबधब्याला भेट देण्यासाठी गेले होते. सकाळी ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर हा गट काळू धबधब्यावर पोहोचला, जो पाच टप्प्यात कोसळतो आणि […]
टॅग: death
भीषण अपघात! लातूर-सोलापूर महामार्गावर दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, 2 ठार, 20 जखमी
लातूर : लातूर-सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या चार दिवसांपूर्वी माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या वाहनाचा अपघात याच मार्गावर झाला होता. आज पहाटे पुन्हा एकदा या मार्गावर भीषण अपघात झाला असून, दोन ट्रॅव्हल्समध्ये पाठीमागून झालेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा […]
भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटली, दोन जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी
रायगड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी प्रवासी बसचा रविवारी रात्री उशिरा रायगड जिल्ह्यातील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाला. या अपघातात सध्या मिळालेल्या माहितीनुसार दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींवर पनवेल आणि कळंबोली येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. […]
पुणे : अल्पवयीन मुलाकडून रिक्षावरील नियंत्रण सुटून अपघात, १९ वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणे : ऑटो रिक्षा चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा रेलिंगवर आदळून अपघात झाला. या अपघातात रितेश शिवाजी गायकवाड (वय १९) याचा मृत्यू झाला. रितेश कात्रजमधील गोकुळ नगर येथील रहिवासी होता. १५ एप्रिल रोजी पहाटे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलावर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलगा १५ एप्रिल रोजी पहाटे ऑटो रिक्षा […]
गायक आणि संगीतकार पंडित संजय राम मराठे यांचे निधन, ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ठाणे : शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे १६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध संगीतकार […]
दुःखद! शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं भीषण अपघातात निधन
मुंबई : माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. आज मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती, त्याच बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे येत होते. बीडमध्ये आज मोठा कार्यक्रम असतानाही समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, हे प्रमाण मानून त्यांनी बीडमधला कार्यक्रम सोडला आणि मुंबईच्या […]
लग्नाच्या पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान झाले असे काही… नववधूचा मृत्यू
ब्राझील : लग्नानंतर वधू-वरांच्या आयुष्यातील पहिली रात्र खूप महत्वाची मानली जाते. लग्नानंतर दोघेही आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहत असतात. परंतु ब्राझीलमध्ये एका नवविवाहित जोडप्याच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. लग्न झाल्यानंतर संसार सुरू होण्यापूर्वीच या नववधूचा मृत्यू झाला. लग्नाच्या पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या इबीराइट शहरात ही घटना घडली […]
संतापजनक : मुलीच्या घशात अडकले होते लिचीचे बी, डॉक्टर म्हणाले, कोरोना रिपोर्ट आणा, पण तोपर्यंत…
बिहार : डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या मुलीच्या घशात लिचीचे बी अडकले होते, त्यामुळे मुलीचे वडील तात्काळ तिला घेऊन रुग्णालयात आले. परंतु, डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयात ही घटना घडली आहे. मृत मुलीचे वडिल म्हणाले […]
हृदयद्रावक : आई वडिलांच्या भांडणात २ चिमुकल्यांचा मनाला चटका लावणारा अंत…
बारामती : कधी कधी भांडणाचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, हे दाखवणारी एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेने आत्महत्या करण्यासाठी गावाबाहेर असणाऱ्या खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतली. हा प्रकार पाहून आईला वाचवण्यासाठी दोन चिमुकल्या मुलांनी देखील पाण्यात उडी घेतली, परंतु, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आईला मात्र पतीने सुखरूप […]
ज्याला मृत समजून अंत्यसंस्कार केले, ‘तो’ नऊ दिवसांनी जिवंत परतला, मात्र भूत समजून…
उदयपूर : राजस्थानमध्ये राजसमंद जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. ज्या व्यक्तीला मृत समजून कुटुंबाने त्याचे अंत्यसंस्कार केले, ती व्यक्ती नऊ दिवसांनी जिवंत परतली. आता पोलिस प्रशासन निरुत्तर आहे की ज्याचे अंत्यसंस्कार केले ती व्यक्ती कोण होती? बेवारस मिळालेल्या त्या मृतदेहाचं ना शवविच्छेदन केलं होतं, ना त्याचा व्हिसेरा ठेवला होता. ही घटना राजसमंद जिल्हा येथील […]










