Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems
महाराष्ट्र राजकारण

राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. यासंबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

प्रवीण दरेकरांची ४ तास चौकशी, पोलिसांवर राज्य सरकारचा प्रचंड दबाव, नियमबाह्य प्रश्न विचारले, दरेकरांचा आरोप…

मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारले. चौकशी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशीचा तपशील सांगितला तसंच सरकारचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप केला. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी सगळी उत्तरं दिली. पोलिसांनी […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

नवी नियमावली! राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल, ‘या’ जिल्ह्यांना मोठा दिलासा

मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच […]

Maharashtra Assembly Monsoon Session: 12 Bjp Mlas Suspended For One Year
महाराष्ट्र

सर्वोच्च् न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा, अध्यक्षांना शिवीगाळ तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, 5 जुलै 2021 रोजी भाजपच्या बारा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन […]

BJP leader Radhakrishna Vikhe Patil
अहिल्यानगर महाराष्ट्र

मुंबई काय राज्‍यापासून वेगळी आहे का? भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीत स्‍वत:ची निर्णयक्षमता दिसून येत नाही. महाविकास आघाडी सरकार मुंबईपुरते निर्णय करीत आहे. त्याचबरोबर सरकारने टास्‍क फोर्सने सुचविलेल्‍या सुचनांचा फेरविचार करावा, असेदेखील विखे […]

The second wave of corona in Maharashtra will completely subside in the first week of May
महाराष्ट्र

आज रात्रीपासून राज्यात नवे निर्बंध, राज्य सरकारकडून नियमांमध्ये बदल, ‘असे’ असतील नवे नियम

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारकडून निर्बंध जारी करण्यात येणार आहेत. नव्या निर्बंधांची अंमलबजावणी रविवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारकडून दोन नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार सोमवारपासून राज्यात व्यायामशाळा आणि ब्युटी पार्लर्स पूर्णपणे बंद असणार होती. तर सलून्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली […]

More stringent restrictions for air travelers on the background of omecron virus
महाराष्ट्र

राज्य सरकारकडून हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध, ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या विषाणूंना ‘चिंतेची बाब’ (Variant of concern) म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्याने महाराष्ट्र शासनाने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत. यासंदर्भात नवीन निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत अ -भारत सरकारने वेळोवेळी लादलेले निर्बंध […]

15-day curfew in Maharashtra from tomorrow
महाराष्ट्र

पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधितांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर

मुंबई : राज्यातल्या पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधितांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात अतिवृष्टी आणि पूरामुळे […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : कोरोना काळात रुग्णालयांना आग लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण […]

Important decision of the state government for flood affected traders in the state
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांसाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला असून ना-नफा तत्वावर अत्यंत […]