औरंगाबाद : औरंगाबाद शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरले आहे. शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी पुन्हा […]
टॅग: औरंगाबाद
कीर्तनकारांचं पॉर्न व्हिडीओ प्रकरण : ‘त्या’ किर्तनकाराला पोलिसांकडून अटक, न्यायालयाकडून जामीन मंजूर
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका किर्तनकार महाराजाचा महिलेसोबतचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर या किर्तनकार महाराजाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्लेगाव पोलिसांनी या किर्तनकाराला अटक […]
विधवेने वृद्ध सासूची काळजी न घेतल्यास अनुकंपा नियुक्ती रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या आठवड्यात स्थानिक जिल्हा परिषदेला आदेश दिले की एका विधवेने अनुकंपा नियुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जावर विचार करा, परंतु, त्यासाठी त्या विधवेने ती आपल्या वृद्ध सासूची योग्य काळजी घेईल असे प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून द्यायला हवे. तिने तसे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तिच्या अर्जावर विचार करावा. या विधवेचे नाव उषा गिरी आहे. न्यायमूर्ती […]
राज्यात थंडीची लाट, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : राज्यात सध्या चांगलीच थंडी जाणवत आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून याबाबत इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र […]
शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी, खचून न जाता उमेदीने उभे राहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
औरंगाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याबाबत मदत म्हणून शासन पीक विमा वेळेत देण्याबाबत काम करत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या मदतीने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पुर्ण करुन मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करावे, त्याचप्रमाणे या संकटात खचून गेलेल्यांना […]
‘या’ जिल्ह्यांत पुढील ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात हाय अलर्ट
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, नाशिक, बीड, परभणी, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात आज पुन्हा हाय अलर्ट असू शकतो. Intense spells of rain […]
औरंगाबाद प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : औरंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे सुरू असलेल्या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, त्यादृष्टीने लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. औरंगाबाद शहराला वैभवशाली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे शहर जागतिक […]
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, ‘या’ शहरांमध्ये कडक निर्बंध
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. […]
औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य
मुंबई : औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते आज (२४ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारलं असता त्यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे सूचक वक्तव्य केले. मात्र त्यामुळे आता महाविकासआघाडीत पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता […]
ब्रेकिंग : जालन्यात कार विहिरीत कोसळून भीषण अपघात, आईसह चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
जालना : औरंगाबादहून शेगावला जाणारी कार विहिरीत कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात आईसह चार वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीतील इतर 3 जणांना वाचवण्यात यश मिळालं आहे. औरंगाबादहून शेगावला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत विहिरीत कोसळली. […]










