नागपूर : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (मासळी मंडई) इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक ठरविण्यात आल्याने रिक्त करुन निष्कासित करण्यात आली. सध्या महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये मासळी परवानाधारकांचे पुनर्वसन करण्यात येत असून तेथे त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत […]
टॅग: उदय सामंत
‘भारतरत्न’ सन्मानित व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्या अर्धपुतळ्यांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार […]
मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत
मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने आहेत. या ठिकाणी कबुतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी व प्रदूषण वाढत असून, यावर नियंत्रण आवश्यक आहे. त्यादृष्टीने कबूतर खाण्यांबाबत तातडीने विशेष ड्राईव्ह घेण्याबाबत मुंबई महापालिकेला आदेश देण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सदस्य मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. […]
पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार – मंत्री उदय सामंत
मुंबई : पुणे शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असतात. तसेच रोजगारासाठी येणाऱ्या तरुण – तरुणींची संख्याही मोठी आहे. पुणे शहरात विद्यार्थी, तरुणांच्या कौशल्य विकासात वाढ करण्यासाठी सी.एस.आर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी) अंतर्गत कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली. पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील समस्यांबाबत सदस्य […]
मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी […]
पोलिसांसमोरच उदय सामंत यांना जाळण्याची धमकी, नाना पटोले यांच्या सभेदरम्यान घडली घटना
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन वातावरण तापलं आहे. रिफायनरीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनही पुकारलं होतं. मात्र आता हा वाद चिघळल्याची लक्षणं दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काल राजापुरात एक सभा झाली. त्यात रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका […]
पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, गाडीच्या काचा फुटल्या
पुणे : माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला झाला आहे. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला आहे. उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात पोहोचला. कात्रज मधील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परतत असताना नेमक्या त्याचवेळी तानाजी सावंत यांच्या घराकडे निघालेल्या उदय […]
प्राध्यापकांच्या ३ हजार ६४ रिक्त जागांची भरती प्रकिया लवकरच
पुणे : उच्चस्तरीय समितीच्या वतीने एकूण 4 हजार 74 प्राध्यापक भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 674 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या काळात थांबलेली 3 हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. नेट-सेट पीएचडी पात्रताधारक […]
उदय सामंत यांची मोठी घोषणा, तेराही विद्यापीठांच्या सर्व परीक्षा आता होणार ऑनलाईन
मुंबई : राज्यात कोरोना परिस्थिती भीषण असून कठोर निर्बंध लागू आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल, असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. उदय सामंत यांनी सांगितलं […]
ब्रेकिंग : १५ फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालयं होणार सुरू
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु होणार आहेत, येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही, याबाबत G. R. काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत […]










