Uday Samant
महाराष्ट्र रत्नागिरी

पोलिसांसमोरच उदय सामंत यांना जाळण्याची धमकी, नाना पटोले यांच्या सभेदरम्यान घडली घटना

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन वातावरण तापलं आहे. रिफायनरीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनही पुकारलं होतं. मात्र आता हा वाद चिघळल्याची लक्षणं दिसत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काल राजापुरात एक सभा झाली. त्यात रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले आणि पोलिसांसमोरच ‘त्या उदय सामंतला जाळून टाकू आम्ही’, अशी धमकी दिली. धमकी देणाऱ्या या कार्यकर्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

धमकी दिलेल्या या कार्यकर्त्याचे नाव अप्पा जोशी असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करत गांभीर्याने दखल घेतली आहे. मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात रिफायनरीला विरोध करणारे आक्रमक झाले आहेत. रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातल्या जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.

या प्रकरणात कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी देखील लक्ष घातले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी आमदार सामंत यांच्यासोबत चर्चा केली असून आता याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत