पुणे : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (IITM) संचालक डॉ. आर. कृष्णन यांनी सोमवारी आयोजित केलेल्या कार्यशाळेत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीवर आणि शहरीकरणामुळे होणाऱ्या हवामानातील बदलांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. ते म्हणाले, “अलिकडच्या काही वर्षांत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अल्पावधीतच मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे पूर येणे आणि भूस्खलन होते, असे निदर्शनास आले आहे. […]
टॅग: मुसळधार पाऊस
पुढील 2 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहणार
पुणे : पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील २-३ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी २ वाजताच्या नवीनतम रडार निरीक्षणानुसार, रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग, नवी मुंबई, रत्नागिरी, पुणे […]
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरूच, आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू
मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाने कहर केला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. १ जूनपासून आतापर्यंत मुसळधार पावसामुळे 120 जणांचा मृत्यू झाला असून 240 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. हवामान खात्याने […]
पुढील 3-4 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, बाहेर पडताना खबरदारी घेण्याचा इशारा
मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 3-4 तासांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत आयसोल ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. बाहेर पडताना खबरदारी घ्यावी असा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत विजांच्या […]
राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार गडगडाटासह पाऊस
मुंबई : राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या […]
कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी, ‘या’ जिल्ह्यांत पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला […]
राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी
मुंबई : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढत जाणार आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच, राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी […]
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, पुढील तीन-चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत राज्यातील ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस […]
हवामान खात्याकडून देण्यात येणारे ‘रेड’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्ट म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…
हवामान खात्याकडून इशारा देण्यासाठी विविध रंग कोड वापरले जातात. आपण ‘रेड अलर्ट’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्टबद्दल ऐकलं असेलच. परंतु, या वेगवेगळ्या अलर्टचा अर्थ काय? हे रंग येणार्या धोक्याच्या तीव्रतेशी कसे संबंधित असतात आणि हे कोण सूचीबद्ध करते? आज आपण याविषयी जाणून घेऊ. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) किंवा हवामान विभाग तीव्रतेशी वेगवेगळ्या प्रकारचे इशारे देण्यासाठी […]
अतिवृष्टी भागात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तीन दिवस दौरा
मुंबई : महाराष्ट्रात पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. १९ ऑक्टोबर पासून दौऱ्याला सुरुवात होईल. आपल्या दौऱ्याची सुरुवात देवेंद्र […]





