दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान बनले आहेत. राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. गुणवर्धने हे शिक्षणमंत्री राहिलेले आहेत. 2020च्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते रानिल विक्रमसिंघे यांचे वर्गमित्र आहेत. श्रीलंकेच्या संसदेने 20 जुलै रोजी माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची नवीन राष्ट्रपती म्हणून निवड केली. श्रीलंकेत नव्या […]
टॅग: पंतप्रधान
शाहबाज शरीफ यांनी दाखवले खरे रंग, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनण्याआधीच काश्मीर मुद्द्यावर केले ‘हे’ वक्तव्य
इम्रान खान यांची पाकिस्तानच्या सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ हे नवे वझीर-ए-आझम बनण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे शाहबाज […]
महत्वाची बातमी : वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 12 जणांचा मृत्यू, या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा, प्रियजनांची माहिती मिळवा…
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जम्मूमधील कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. ह्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत 2 महिलांसह 12 भाविकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच २० पेक्षा अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. Extremely saddened by the loss of lives due to a stampede at Mata Vaishno Devi Bhawan. Condolences […]
पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दक्षिण भागात तीन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबाद आणि हुगली येथे प्रत्येकी नऊ आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीज कोसळून जीव गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केलं असून पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे, केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. पहिली घोषणा सर्व राज्यांना आता केंद्राकडून मोफत लस दिली जाईल. आता राज्यांना यासाठी काही खर्च करावा लागणार नाही. तर दुसरी घोषणा म्हणजे, देशातील 80 कोटी गरीब लोकांना नोव्हेंबर म्हणजे दिवाळीपर्यंत मोफत रेशन दिले जाईल. पंतप्रधान मोदी […]
पंतप्रधान मोदी फार सरळमार्गी नेते, राष्ट्रीय एकात्मता फक्त काँग्रेसचा मक्ता नाही – संजय राऊत
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमछा घातला होता. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचून घेतली, त्यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा […]
शेतकरी आंदोलन : पुढील बैठक 2 फेब्रुवारीला, ‘मन की बात’ वर राकेश टिकैत म्हणाले..
शेतकरी आंदोलनाच्या 67 व्या दिवशी शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर 2 फेब्रुवारी रोजी सरकार शेतकऱ्यांशी 13 व्या फेरीची बैठक घेणार आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास सदैव तत्पर आहे. 22 जानेवारी रोजी शेतकर्यांना दिलेला प्रस्ताव अद्याप अबाधित […]
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी कोरोना लस घेणार
केंद्र सरकारने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. […]
जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून गरिबांसाठी घरे, 6 राज्यांत लाइट हाऊस प्रकल्प सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील सर्व बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या दिशेने पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाईट हाऊस प्रकल्पाचे उद्घाटन केले. नवीन वर्षात पंतप्रधान मोदींचा हा पहिला कार्यक्रम आहे. पीएम मोदींचा हा कार्यक्रम शहरी भारतातील लोकांना घरे पुरविण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या […]
शेतकर्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार, जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या संबोधनातील सर्व मुद्दे
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी चळवळीदरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचे 18 हजार कोटी रुपये 9 कोटी शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केले. यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांना संबोधित केले. मोदींनी आज पुन्हा नवीन कृषी कायद्यांचे फायदे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे : बंगालमधील 70 लाख शेतकर्यांना लाभ न मिळाल्याची खंत […]










