पुणे : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. २२ एप्रिलला सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील […]
टॅग: करोना
राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे त्यांनी स्पष्ट केले. लोकल प्रवासाबाबत सध्या जे निर्बंध आहेत ते […]
अभिनेता गुरमीत चौधरीची स्तुत्य कामगिरी, अवघ्या १६ दिवसांत उभारले हजार बेड्सचे कोविड हॉस्पिटल
मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी सरकारच्या मदतीसाठी काही समाजसेवी संस्था, काही नागरिक तसेच मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारही गरजू लोकांना मदत करत आहेत. आता अभिनेता गुरमीत चौधरीही कोरोना पेशंटसाठी काम करत आहे. त्याने महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये ‘आस्था’ नावाने कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी गुरमीतने लखनऊ, […]
‘या’ जिल्ह्यावर कोसळलं दुहेरी संकट; ४० ते ४५ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान तर पक्ष्यांनाही गमवावे लागले जीव
गडचिरोली : कोरोनाचं संकट गडद होत असतानाच अनेक भागांना सातत्याने चक्रीवादळाचा तडाखा बसत असल्याने दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मागच्या आठवड्यात काही भागात चक्रीवादळासह पावसाने धुमाकूळ घेतला आहे त्यामुळे घरांची पडझड तसेच पिकांचे नुकसान झाले होते. १ मे रोजी रात्री पुन्हा एकदा अचानक चक्रीवादळ आल्याने मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा गावातील नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात […]
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : करोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबत आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महानगरपालिका […]
मासिक पाळी दरम्यान लस घेणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या..
मुंबई : 1 मे पासून १८ वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होत आहे. त्यातच सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यानुसार मासिक पाळीच्या आधी आणि नंतर चार पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशावेळी मुलींनी लस घेणे टाळावे अशा प्रकारचा दावा करण्यात येत आहे. परंतु हा दावा खोटा आहे. हा दावा अशास्त्रीय असून यावर विश्वास […]
राज्यात कडक लॉकडाऊन लावले जाण्याची शक्यता; दोन दिवसांत निर्णय.. ‘या’ मंत्र्याचे मोठे विधान
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेतपुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सरकार पुढचे पाऊल टाकण्याचा गंभीरपणे विचार करत आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री […]
धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून रुग्णालयात तोडफोड; डॉक्टरांवर गंभीर आरोप
नगर : अहमदनगर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी तोडफोड केली. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. मिळालेल्या माहिती नुसार, नगर तालुक्यातील वाकडी या गावातील कोरोनाबाधित रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य […]
अन्यथा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने होतील बंद.. पुणेकरांसाठी महत्वाची सूचना
पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहराकडे किराणा, भाजीपाला, फळे, दूध आदी अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी गर्दी होत असल्यास संबंधित दुकाने ही मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. मोकळी जागा उपलब्ध नसेल आणि गर्दीवर नियंत्रण आणणे शक्य होत नसेल तर ती दुकाने बंद करण्याचे अधिकारही […]
राज्यात फेब्रुवारी पासून आतापर्यंत तीस पट रुग्णसंख्या वाढली, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन आज केले. तसेच लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. तसेच त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून […]










