हैदराबाद : ऑस्ट्रेलियाने भारताला 187 धावांचे लक्ष्य दिले आहे. ग्रीन आणि डेव्हिड यांनी अर्धशतक केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आज हैदराबादमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात आमनेसामने आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला, ऋषभ पंतला आज संधी मिळाली नाही, तर भुवनेश्वर कुमार परतला आहे.
तीन सामन्यांची ही मालिका एक-एक अशी बरोबरीत असून मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना आहे. ऑस्ट्रेलियानेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. शॉन ऍबॉटच्या जागी जोश इंग्लिसला संधी दिली आहे. नाणेफेक जिंकणे आज भारतासाठी फायद्याचे ठरू शकते.
Innings Break!
Australia post a total of 186/7 on the board.#TeamIndia chase coming up shortly. Stay tuned.
Scorecard – https://t.co/g9kw53R9ay #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/8lRHeJFaJv
— BCCI (@BCCI) September 25, 2022




