मुंबई : बिहारच्या जनतेला जंगलराज नको, तर विकास हवा आहे. हे त्यांनी या निवडणुकीतून सिद्ध केलं आहे. या निवडणुकीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणखी एक मोहर लागली आहे. बिहारच्या जनतेने बिहारचे मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला आहे. मी बिहारच्या जनतेचं कोटी कोटी अभिनंदन करतो. त्यांना अभिवादन करतो, देशातील 11 राज्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. बिहारसह या राज्यांमध्येही पंतप्रधान मोदींवर विश्वासाची लहर आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगना तसेच इतर राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
धन्यवाद बिहार!
बिहार कि जनता ने यह साफ कर दिया है की वे विकास चाहते है,ना की जंगलराज!
हमारे जनप्रिय प्रधानमंत्री मा@narendramodi जी इनके नेतृत्व पर मोहर लगायी है।@NitishKumarजी पर सम्पूर्ण विश्वास दिखाया है।मैं बिहार की जनता का कोटि कोटि अभिनंदन करता हूँ,उन्हें अभिवादन करता हूँ।— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2020
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपने बिहारमध्ये 110 जागांवर निवडणूक लढली. यापैकी जितक्या जागांवर विजय मिळाला त्याचं प्रमाण 67 टक्के इतकं आहे. हे प्रमाण 2015 च्या निवडणुकीत फक्त 34 टक्के होतं. याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदीचं गरिब कल्याण अजेंडा आणि कठोर परिश्रम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना जातं. मी भाजपच्या बिहारच्या टीमचं अभिनंदन करतो, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देखील ट्विटरवर जनतेचे आभार मानले आहेत. बिहारच्या युवा पिढीने सिद्ध केलंय की, नवं दशक हे बिहारचं असेल. बिहारच्या युवकांनी एनडीएच्या संकल्पावर विश्वास ठेवला आहे. या युवा ऊर्जामुळे एनडीएला आणखी परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे, असं मोदी म्हणाले आहेत.
बिहार के युवा साथियों ने स्पष्ट कर दिया है कि यह नया दशक बिहार का होगा और आत्मनिर्भर बिहार उसका रोडमैप है। बिहार के युवाओं ने अपने सामर्थ्य और NDA के संकल्प पर भरोसा किया है। इस युवा ऊर्जा से अब NDA को पहले की अपेक्षा और अधिक परिश्रम करने का प्रोत्साहन मिला है।
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2020




