lakhimpur kheri incident supreme court ask for detailed status report up government
देश

ब्रेकिंग! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीन रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सोमवारी आला. न्यायालयाने आशिष मिश्राचा जामीन रद्द केला आहे. यासोबतच आशिष मिश्राला जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सुप्रीम कोर्टाने बाजूला ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ४ एप्रिल रोजी सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. 10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने या प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला होता. त्यापूर्वी तो चार महिने कोठडीत होता.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे एका कारने चार शेतकऱ्यांना चिरडले होते, तेव्हा शेतकऱ्यांच्या एका गटाने भाजप नेते केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधात आंदोलन केले होते. संतप्त आंदोलकांनी भाजपचे दोन कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरला बेदम मारहाण केली, तर एका स्थानिक पत्रकाराचाही या हिंसाचारात मृत्यू झाला. आशिष मिश्रा हे आंदोलकांना चिरडणाऱ्या वाहनात होते, असा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. मात्र, मिश्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत