मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांना 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने अनिल परब यांना मंगळवारी (३१ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट करत म्हटले कि केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र.”
शाब्बास!
जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) August 29, 2021




