अहमदनगर : गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा पुढे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवलेली आहे. भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे म्हटल्या कि विजयादशमीचं महत्त्व काय तर सीमोल्लंघन. गोपीनाथ मुंडे यांनी ते केलं. साहेबांना कधी दिल्ली दिसायची, तर कधी मुंबई, एका दसरा मेळाव्याला पंकजा दिसली पण साहेब आपल्यात राहिले नाहीत, अशी खंत पंकजा यांनी व्यक्त केली.
पुढे त्या म्हटल्या कि खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. पंकजा मुंडे घरी बसल्या आहेत. गोपीनाथ मुंडे गेले आहेत. अपप्रचार सुरू होता. पण, करोना काय मी आणला का? करोनात जबाबदारीनं वागले. साहेबांच्या जयंतीला परवानगी मागितली, तेव्हा मला विनंती केली. पण, भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय राहू शकत नाही. जिवंत असेपर्यंत भगवान गडावर येत राहिन.
‘‘आपला दसरा”
भगवान भक्तीगड, सावरगाव. #Live#AaplaDasra2020https://t.co/sAEhNaGtpc— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 25, 2020
अतिवृष्टीमुळं शेतकरी बेजार झाला आहे. मी सरकारकडे मदतीची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मदत जाहीर केली. सरकारनं १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पण, ती पुरेशी नाही. शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे. त्यामुळे सरकारनं आणखी मदत जाहीर करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.




