मुंबई : हवामान विभागाकडून मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारे वाहतील. २३ तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्र किनारपट्टीपासून कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, पूर्व-पश्चिम वाऱ्यांची स्थितीही पावसासाठी अनुकूल आहे.




