मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान हे चाळीसच्या वर गेले असून हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. शक्यतो दुपारी घरी किंवा ऑफिसमध्येच राहा आणि अगदी आवश्यक असेल तरच प्रवास करा, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.
पुढील ५ दिवस विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातल्या चार जिल्ह्यांमध्ये आजपासून तापमान असेच वाढत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
28 April: पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. या काळात ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता.
आज दक्षिण मध्य महाराष्ट्र,दक्षिण कोकणच्या काही भागात मेघगर्जनेची शक्यता
Pl follow Heatwave guidelines@CMOMaharashtra pic.twitter.com/CNUIVZxhmb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 28, 2022




