महाराष्ट्र मुंबई

मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबईत आज मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, अंधेरी सबवे, किंग्ज सर्कल तसेच कुर्ला परिसर येथे पाणी साचले आहे. दोन ते तीन फूट पाणी भरल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानची मध्य रेल्वे बंद झाली आहे. तर हार्बर रेल्वेवरील वाशी- ते सीएसएमटी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावरील अंधेरी- सीएसएमटी वाहतूकही ठप्प झाली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने बेस्टनेही वाहतुकीचे आठ मार्ग बदलले आहेत. पश्चिम द्रुतगती मार्ग व पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ढगाळ हवामान आणि मुसळधार पावसामुळे दृष्यमानता देखील कमी झाली होती.

मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात 9 जून ते 13 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत