मुंबई : मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळी कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून या कारवाईला विरोध होत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केला असून त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतुल भातखळकर यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं कि, “कुरार परिसरातील नागरिकांना शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिस देण्यात आली आणि त्यानंतर आज सकाळी-सकाळी पोलीस बंदोबस्तात झोपड्यावर कारवाई करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराबाहेर काढण्यात आलं. आम्ही याला विरोध केला. त्यामुळं आम्हाला ताब्यात घेतलं.
ठाकरे सरकारची मोगलाई…
शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
भातखळकर पुढे म्हणाले कि, “ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे एमएमआरडीएनं तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करुन आरे पोलिस ठाण्यात नेत आहे,’ असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. ‘मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले. त्या प्रकल्पातील एक स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?”
मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले त्या प्रकल्पातील एक स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही? @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @JaiMaharashtraN
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
‘कुरारची कारवाई ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी आहे. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू,’ असा इशारा यावेळी भातखळकर यांनी दिला आहे.




