राज्याच्या हवामानात बदल दिसून येत आहेत, त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली असून थंडी जाणवत आहे. मात्र दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.