केरळमधील इडुक्की जिल्ह्यात तुफान पाऊस पडत असून पर्यटन स्थळ असणाऱ्या मुन्नार येथून २५ किमी अंतरावर भूस्खलन झालं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जणांची सुखरुप सुटका कऱण्यात आली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. अजून किती लोक अडकले आहेत याची माहिती सध्या प्रशासन घेत आहे. गावाला जोडणारा पूल पावसात […]
देश
Stay updated with the latest national news from Maharashtra and India. Our ‘Nation News’ section covers important updates on government decisions, political events, social issues, and international developments that shape the nation.
चेन्नईमध्ये तब्बल ७०० टन अमोनियम नायट्रेट
दोन दिवसांपूर्वी बैरुत येथे साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटचा मोठा स्फोट झाला होता. आता भारतातही साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटवरून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चेन्नईच्या बाहेरील परिसरात तब्बल ७०० टन अमोनियम नायट्रेट साठवण्यात आलं आहे. यावरून अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. २०१५ मध्ये अमोनियम नायट्रेटचा हा साठा चेन्नई बंदरावर जप्त करण्यात आला होता आणि तेव्हापासून तो […]
लता दीदींनी दिलं ‘या’ दोन नेत्यांना राममंदिर निर्माणाचं श्रेय
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत राम मंदिर निर्माणाचा आनंद व्यक्त केला. लतादीदींनी ट्विट करत म्हटलं, नमस्कार. अनेक राजांचं, अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे, शीलान्यास होत आहे. मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय […]
राम मंदिर भूमिपूजनानिमित्त बाळासाहेबांची आठवण, #DhanyawadBalasaheb हॅशटॅग होतोय ट्रेण्ड
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली जात आहे. एकीकडे शिवसेना तसंच इतर नेते बाळासाहेबांच्या आठवणी शेअर करत असताना ट्विटरवर देखील बाळासाहेब ठाकरेंचं नाव चर्चेत आहे. ट्विटरला भूमिपूजनानिमित्त अनेक ट्रेंड होत असून यामध्ये #DhanyawadBalasaheb टॉप ट्रेंडमध्ये आहे. अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे त्यामध्ये बाळासाहेबांचीही मोलाची भूमिका असल्याचं सांगत नेटकरी त्यांचे […]
प्रभू रामललासाठी रत्नजडीत वस्त्र
आज अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येच्या चौकाचौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झालेले आहेत. प्रभू श्रीराम यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सर्वांच्या स्वप्नातलं राम मंदिर अखेर साकारण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन पार […]
राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ
राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आज अखेर उजाडला आहे. अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ माजली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर बोलताना ओवैसी म्हणतात की, बाबरी मशीद तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहिल. तसेच बाबरी मशीदचा जुना फोटो टाकताना त्यांनी ‘बाबरी जिंदा है’ (#BabariZindaHai) या हॅशटॅगचाही वापर केला आहे. धर्मनिरपेक्षता हाच […]
आज बाळासाहेब असायला हवे होते, भूमिपूजनाच्या संदर्भात राज ठाकरेंकडून आठवण
आज अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. शिवसेनेसह मनसेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे लिहितात, या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येत आहे, या मंगलप्रसंगी ते असायला […]
राम मंदिरासाठी २८ वर्षांपासून उपवास
रामललाच्या जन्मस्थानी प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहणार आहे. अयोध्येत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंदिर उभे राहावे, त्यासाठी राम भक्तांनी शेकडो वर्ष संघर्ष केला आहे. अयोध्येत राम मंदिर उभे रहावे, यासाठी पडद्यामागे अनेकांनी हातभार लावला आहे. समाजात अशा काही व्यक्ती आहेत, ज्यांनी पडद्यामागे राहून राम मंदिराच्या […]
यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर
नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी युपीएससीच्या अधिकृत वेसबाईटवर […]
केंद्र सरकार बेकायदेशीरपणे राजकीय नेत्यांना ताब्यात घेतं तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो- राहुल गांधी
केंद्र सरकारने गतवर्षी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० काढून घेत त्याचं विभाजन केलं. यानंतर कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल यादृष्टीने अनेक राजकीय नेत्यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवण्यात आलं. यामध्ये मेहबुबा मुफ्ती यांचाही समावेश होता. अनेक नेत्यांची सुटका करण्यात आली आहे. मार्च महिन्यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांची […]










