बीड : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात बुधवारी दुपारी एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. कोळवाडी गावातील ४५ वर्षीय मनकर्णा शिवराम नेटके यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. ही घटना रूपपूर शिवर परिसरात घडली. सकाळच्या सुमारास जवळच्या डोंगराळ भागातून बिबट्याची डरकाळी ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, शेतात काम करणाऱ्या मजुरांनी याकडे विशेष […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक
मुंबई : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबई व पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भात आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश […]
गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता
मुंबई : राज्यातील टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य व हमखास दर मिळावा, तसेच पूर्व विदर्भातील टसर रेशीम मूल्यसाखळी अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे शासकीय टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३–२८ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पासाठी ₹३.८८ कोटी […]
अक्षय कुमारच्या गाडीला धडक! जुहूमध्ये थरारक अपघात, व्हिडीओ व्हायरल
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील गाडीचा मुंबईत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जुहू परिसरात घडला असून, अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी एका गाडीतून विमानतळावरून घरी जात असताना ही घटना घडली. सुदैवाने अक्षय कुमार आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार यांच्या […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 10 मोठे निर्णय, मुंबईकरांना मोठे गिफ्ट…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील पथकरात आणखी एका वर्षाची सवलत, तसेच नगर विकास, नियोजन, महसूल व इतर विभागांशी संबंधित महत्वाचे निर्णय सामावले होते. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीस मंत्रिमंडळातील अनेक सदस्य […]
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी जबरदस्ती शारीरिक संबंध, तरुणीची पहाटेच पोलीस ठाण्यात धाव…
रायगड : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन १८ वर्षे ७ महिन्यांच्या तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार अलिबाग तालुक्यात समोर आला आहे. पीडित तरुणीने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत आरोपी नितेश पाटील उर्फ पप्प्या, रा. खंडाळे, याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी […]
राज्यात चार दिवस कडक दारूबंदी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांना अवघे काही दिवस उरले असताना, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (SEC) आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया निष्पक्ष व्हावी यासाठी १३ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यातील प्रमुख शहरांमध्ये “ड्राय डे” लागू करण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार, मुंबई, पुणे, […]
शरीरासाठी सुपरहिट! हळदीच्या ‘या’ पेयांचे जबरदस्त फायदे जाणून घ्या…
पुणे : हिवाळ्याचा काळ जरी उष्णतेपासून दिलासा देत असला तरी तापमानातील घट, कोरडी हवा आणि कमजोर होत जाणारी रोगप्रतिकारशक्ती यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, सायनस, सांधेदुखी आणि अपचनसारख्या तक्रारी वाढू लागतात. मात्र, या समस्यांवर घरच्या घरी सहज उपलब्ध होणारे उपाय माहित असतील तर काळजी करण्याची गरज नाही. भारतीय घराघरात सहज आढळणारी हळद, विशेषतः ओली हळद, […]
हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
मुंबई : हिवाळ्याचे दिवस सुरू होताच तापमानात अचानक घट होते आणि त्यामुळे सर्दी, खोकला, त्वचा कोरडी पडणे, सांधेदुखी अशा तक्रारी वाढतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या हंगामात योग्य आहार, योग्य कपडे आणि स्वच्छ जीवनशैली अवलंबल्यास अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो. 1. कोमट पाणी नियमित प्या हिवाळ्यात तहान कमी लागते, परंतु शरीरातील द्रवपातळी टिकवण्यासाठी कोमट पाणी […]
साताऱ्यात हृदयद्रावक घटना! जवानाच्या अपघाती मृत्यूनंतर काही तासांत पत्नीने दिला मुलीला जन्म, नवजात बाळाचा वडिलांना शेवटचा निरोप
सातारा : सातारा तालुक्यातील आरे-दर गावात घडलेली घटना मानवी भावनांना हेलावून टाकणारी ठरली आहे. भारतीय लष्करातील जवान प्रमोद जाधव यांच्या मृत्यूने गावावर शोकछाया पसरली. नवजात मुलीच्या जन्मानंतर अवघ्या काही तासांतच या सैनिकाची अंत्ययात्रा निघाल्याने गावातील प्रत्येकाचे मन हेलावून गेले. प्रमोद जाधव काही दिवसांच्या रजेवर घरी आले होते. पत्नीची प्रसूती जवळ असल्याने त्यांना कुटुंबासोबत काही मौल्यवान […]










