मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने सचिन वाझे अटक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने या प्रकरणावरून शिवसेना आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे अटक प्रकरणाचा योग्य तपास केला तर सत्य बाहेर येईल आणि शिवसेनेचं सरकार कोसळेल, असं तिने ट्विट करत म्हटलं आहे.
कंगना रनौतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “या प्रकरणात एक मोठं कारस्थान शिजत आहे. या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. परंतु, शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांनी या अधिकाऱ्याला परत आणलं. या प्रकरणाचा योग्य तपास केल्यास केवळ या प्रकरणातील रहस्यचं बाहेर येणार नाहीत तर महाराष्ट्र सरकार देखील कोसळेल. मला हे देखील जाणवत आहे की आता माझ्यावर 200 पेक्षा जास्त FIR दाखल होतील. होऊ द्या. जय हिंद.”
My X-rays can detect huge conspiracy here,this cop was suspended after Shivsena came in power they got him back, if investigated properly not only hidden skeletons will roll out but even Maharashtra government will fall,I can also sense 200 more FIR’s on me, bring it on,Jai Hind https://t.co/Mt7KpKNghp
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 14, 2021




