मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात आज सकाळी (१६ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. ही बस सतनाकडे जात असताना कालव्यात कोसळली. बसमध्ये ५४ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस कालव्यात कोसळल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 7 लोकांना वाचवण्यात यश मिळालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस कालव्यात कोसळली. ही घटना सकाळी आठ वाजता घडली आहे. बसमधील 12 हून अधिक प्रवासी स्वत: च पोहत पाण्यातून बाहेर पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सिधीच्या डीएमशी संपर्क साधला. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना बाणसागर धरणातील कालव्याचे पाणी थांबविण्याचे आदेश दिले, जेणेकरून कालव्याचे पाणी कमी होईल आणि बचावकार्य वेगाने करता येईल.




