पुणे, दि. ६ : “दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे” असा इशारा मद्याच्या प्रत्येक बाटलीवर छापलेला असतो. मात्र, या इशाऱ्यांचा केंद्रबिंदू मुख्यतः शारीरिक आरोग्यावर असतो. मद्यपानामुळे होणारे मानसिक परिणामही तितकेच गंभीर असून, त्याबाबत जनजागृती करणेही तितकेच आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विल्यम साळवी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. साळवी यांनी दिलेल्या निवेदनात […]
टॅग: Maharashtra news
नवविवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ; काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील टाकरखेड वायाळ (ता. देऊळगाव राजा) येथे मंगळवारी (दि. 5 ऑगस्ट) दुपारी एक नवविवाहिता विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. दिपाली वैभव बनसोडे (वय 26) असे या महिलेचे नाव असून, केवळ साडेतीन महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मूळची मिसाळवाडी (ता. देऊळगाव […]
मुंबई – गोवा महामार्गावर गॅस टँकर उलटला, सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी नाही
मुंबई : मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गॅस टँकर उलटण्याच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम)च्या वतीने कळविण्यात आले आहे. महामार्गावरील हातखंबा पुनर्रचना विभागात आज सकाळी 9.30 वाजता गॅस टँकर अतिवेगामुळे उलटला. या दुर्घटनेबाबत प्रसार माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले होते. टँकरजवळ उभ्या असलेल्या लहान […]
झाडाच्या फांद्या तोडताना तोल जाऊन मजुराचा मृत्यू; ठेकेदार व सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : बाणेर येथील ऋतुरंग पार्क सोसायटीच्या आवारात झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना २७ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात ठेकेदार व सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लहू गुलाब क्षीरसागर (वय ६६, रा. इंगवले चौक, […]
महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये
मुंबई : महिला अत्याचाराची प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या तीन न्यायालयांसाठी प्रत्येकी ५ नियमित पदे (१ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, १ लघुलेखक, १ अधीक्षक, १ वरिष्ठ लिपिक, १ कनिष्ठ लिपिक) […]
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांवर आरोपपत्र दाखल
पुणे : वैष्णवी शशांक हगवणे हिच्या हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी पुणे सत्र न्यायालयात एकूण ११ आरोपींविरुद्ध सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १,६७० पानी आरोपपत्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले असून, त्यामध्ये सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर […]
डॉक्टरची कार उलटून अपघात, पादचाऱ्यासह तिघांना गंभीर दुखापत
पुणे : पुण्यातील रस्ते सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारी घटना सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. रामकृष्ण नाट्यगृहाजवळ एका डॉक्टरची कार उलटून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर तसेच रस्ते पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साधारण ११ वाजताच्या सुमारास डॉक्टर आपल्या टाटा टियागो (MH 14 JA 0262) या […]
पुलावर सेल्फी घेतला आणि क्षणार्धात नदीत उडी; २३ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत
नागपूर : “अहो ऐका ना, एक सेल्फी घ्या!” असं म्हणत पुलावर थांबलेल्या महिलेने काही क्षणांतच नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. कन्हान नदीवरील नेरी पुलावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेचे नाव ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) असून, त्या सध्या नागपूरच्या मानेवाडा परिसरात पतीसोबत राहत होत्या. मूळच्या त्या रामटेक तालुक्यातील […]
जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता – मंत्री संजय राठोड
मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदारित्या राबविली जाईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते […]
विद्यार्थ्यांनो देश व राज्याचा नावलौकीक वाढवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा : शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या […]










